खड्डयांनी घेतला महिलेचा बळी

23

रत्नागिरी / प्रतिनिधी

शहरानजीकच्या शिरगाव गडगेवाडी येथे रस्त्यावरील खडय़ामुळे दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल़ा रिझवाना समीर मुजावर (45, ऱा शिरगाव, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आह़े रत्नागिरीच्या ग्रामीण भागात खड्डेमय रस्त्यांमुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला असून रिझवाना खड्डयांच्या पहिल्या बळी ठरल्या आहेत़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिझवाना सोमवारी सायंकाळी मुलगा शयबान मुजावर (21) याच्यासोबत एटीएममधून पैसे काढण्यासाठी कासारवेली येथे जात होत्य़ा मुलाच्या दुचाकीवरून  (एमएच 08 एएच 9540) जात असताना शिरगाव गडगेवाडी येथे रस्त्यावरील खड्डयामध्ये त्यांच्या दुचाकीला जोरदार धक्का बसल़ा यामध्ये रिझवाना व त्यांचा मुलगा गाडीसह रस्त्याच्या बाजूला कोसळल़े या अपघातात रिझवाना यांच्या डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल़ी

यावेळी मुलाने रिझवाना यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केल़े मात्र वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना तपासून मृत घोषीत केल़े दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिरगाव येथील नागरीकांना जिल्हा शासकीय रूग्णालयात गर्दी केली होत़ी रस्त्यावरील पडलेल्या खड्डयांबाबत देखील लोकांकडून संतप्त प्रतिक्रीय उमटत आहेत़