ईडीच्या रडारवर आता राजापूर तालुका?

28

राजापूर/प्रतिनिधी:-

राज्यासह देशाच्या विविध भागात ईडीची जोरदार चर्चा सुरू असताना व अनेकजण ईडीच्या रडारवर असताना आता या ईडीचे डोळे राजापूरकडे वळल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. तालुक्यातील एका प्रस्तावित प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिनींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले होते. शासनाने या खरेदी-विकी व्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे. अशातच राजापूर सब-रजिस्ट्रार कार्यालयातून ईडीने (सक्त वसुली संचालनालय) जमिन खरेदी-विक्रीचे दस्ताऐवज घेतल्याची माहिती पुढे आली आहे. एका कंपनीच्या चौकशीसाठी ही माहिती घेतल्याचे वृत्त असून, त्यामुळे राजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.