हिंदूंच्या भावनांचा अवमान करणाऱ्या राणा दापत्यांवर गुन्हा दाखल करा – संदीप सरवणकर…

15

वैभववाडी/प्रतिनिधी:-

हिंदू धर्माचे आराध्य दैवत श्री गणपती विसर्जन राणा दापत्यांनी चुकीच्या पद्धतीने केले.यामुळे हिंदूंच्या भावनांचा अवमान केला आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणा-यांना अस वागण शोभनीय नाही. राणा दापत्यांवर हिंदु धर्मीयांच्या भावनांचा अनादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीचे सदस्य संदीप सरवणकर यांऩी केली आहे. यावरून त्यांनी शिंदे फडणवीस सरकावरही जोरदार टीका केली आहे. श्री. सरवणकर यांनी आज माध्यमाशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, “मशिदीच्या भोंग्यावरुन तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालीसी वाचण्याचा हट्ट करणाऱ्या राणा दापत्यांनी गणपती विसर्जनात हिंदू विरोधी कृत्य केले आहे.यामुळे हिंदुच्या भावना दुखावल्या आहेत. अखिल हिंदुत्वाचा दावा करणा-या शिंदे सरकारने आता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची हिमंत दाखवावी.तसेच त्यांना हिंदुत्वाची खरी किंमत दाखवून द्यावी.तसेच पोलीस ठाणेत पोलीसांना त्यांचे कर्तव्यावर असताना ज्या उभयतांनी दादागिरी व दमदाटी केली.तसेच सरकारी कामात अडथळा आणला आणि कायदा व सुव्यवस्थाची ढळलेली विश्वासहर्ता जनतेसमोर दाखवली. त्याबाबत ही बाळासाहेबांचा वारसा सांगणारे सरकाराने ‘ सरकारतर्फे गुन्हा दाखल करावा.

नाहीतर धर्मवीर सिनेमाचे डायला़ँग प्रमाणे ” कुठे आहे, एकनाथ ? ” असे जनतेला पुन्हा कपाळावर हात मारुन म्हणावे लागेल. सर्व काही ओके हे बीरुद मिरवणा-या सरकारने जर हे गुन्हे ह्या पितृपक्षाचे आत दाखल केले नाही. तर जनता सर्वपितृ अमावस्या त्यांचे राजकीय जीवनात कायमची आणल्या शिवाय राहणार नाही अशा मिश्कील शब्दांत श्री. सरवणकर यांनी टीका केली.